Wednesday, May 6, 2009

नवी वाट...नवा जोश.

नुकतेच UPSC चे रिझल्ट लागले. महाराष्ट्र मधले इतके विद्यार्थी चमकलेले कळल्यावर छान वाटले.
आणि खरेच आपला देश मुख्यत्वे मराठी लोक पुढे जात आहे असे वाटायला लागले.
म्हणजे आता ही सगळी नवीन, युवा, जोशपूर्ण पिढी प्रशासकीय, परराष्ट्र, पोलिस सेवेत रुजू झाल्यावर थोड़े फार तरी चित्र बदलेल अशी अपेक्षा ही आणि आशा ही आहे. कारण इतक्या उच्च पदावर जाण्याची आस या सगळ्या मंडळीनी फ़क्त पैसे कमावण्याच्या उद्देशाने धरली असेल असे वाटत नाही. अर्थात हे त्यातल्या काही काहींच्या वृत्तपत्रात दिलेल्या प्रतिक्रिया किंवा भावना वाचल्यावर केलेले अनुमान.

पिढी नुसार विचार बदलतात हे पाहिले, ऐकले होते पण त्यांचा इतक्या मोठ्या स्तरावर आणि इतका चांगला उपयोग होऊ शकतो हे मात्र अचानक जाणवले.
पूर्वी खुपच कमी लोक या वाटेने जायचा विचार तरी करायचे आणि त्यातले अगदीच नगण्य सगळ्या सुविधा, अनुकूल वातावरण मिळाल्यामुळे यशस्वी व्हायचे. जे यशस्वी होत, त्यातले अगदी थोड़े विद्यार्थी लोकांसाठी, समाजासाठी काहीतरी करायची इच्छा ठेवायचे, परिणामी त्यांचा इतका उपयोग झाला नाही असे मला वाटते.
पण आता परिस्थिती वेगळी आहे. अगदी तळागाळातले आणि परिस्थिती नसणारे विद्यार्थी देखील खूप प्रयत्न आणि अभ्यास करून यशस्वी होत आहेत आणि म्हणुनच तेच या पदाचा आणि अधिकाराच योग्य आणि लोकहितार्थ उपयोग करतील अशी शक्यता आहे.
आणखी एक कारण हे की, साध्य असेही विद्यार्थी या यशास्वितांच्या यादीत आहेत की ज्याना दुसरी अनेक जास्त पैसे आणि आरामाचे आयुष्य देणारी कारिअर्स उपलब्ध होती, पण तरीही ही (सुरुवातीपासुनच) अवघड आणि संघर्षमय असणारी वाट निवडली , याचाच अर्थ त्यानी पैशांसाठी हे क्षेत्र नक्कीच निवडले नाहीये.
म्हणुनच या अशा लोकांकडून खूप आशा आहेच , पण इतरानी प्रेरणा ही घ्यावी ही इच्छा आणि ह्या दिशेने वाटचाल करणार्या सगळ्यांचे सर्वप्रथम अभिनंदन आणि यश मिळावे ही सदिच्छा आणि त्यासाठी शुभेच्छा !

Monday, April 27, 2009


कालच मी घरी गेले आणि समजले की एके ठिकाणी हळदी - कुंकुचे आमंत्रण आहे. मग तयार झाले आणि तिथे गेले.
ज्यांच्याकडे मी गेले त्यांच्या घरी सतत काही ना काही अशा प्रकारचे कार्यक्रम असतात. अशा प्रकारचे म्हाणन्यामागचे कारण हे की ते कार्यक्रम mostly या मुहुर्तावर ही पूजा, या देवाची/ देवीची पूजा, या महिन्यातली ही पूजा, या तिथी किंवा या दिवशी ही पूजा करायची असते म्हणुन या सगळ्या पूजा.
आणि तिथे discussion चालू होते की, मोठ्या माणसांनी हे continue केले तरच पुढच्या पिढीला ते समजेल आणि त्याना तो वारसा पुढे चालावता येईल वगैरे. as usual मला ते पटले नाही. कारण आजच्या काळात जिथे नवरा बायको दोघेही जिवाची कुतरओढ़ करून नोकरी करतात त्याना हे सगळे करायला खरेच वेळ आहे ? (अर्थात जिथे मदत करायला घरात मोठी माणसे आहेत त्यानी स्वेछेने करायला हरकत नाही) त्यानी हे सगळे सांभाळावे की या इतक्या स्पर्धेच्या युगात स्वतःची नोकरी टिकवून ठेवण्यासाठी जास्त प्रयत्न करावेत ? हा नास्तिक विचार आहे असे नाही, rather तो जास्त practical विचार आहे, कारण उद्या जर एखाद्याची नोकरी जरी गेली तर या सगळ्या पूजा अर्चा नवीन नोकरी नाही मिळवुन देऊ शकत. असो.

तशा त्या बाई घरीच असतात, पण तरीही मला एक आश्चर्य वाटते की लोक इतक्या religiously इतक्या गोष्टी इतकी वर्षे कशी करू शकतात ? म्हणजे घरात परंपरेने दरवर्षी एखादे कार्य असते आणि म्हणुन ते नेहेमी करत राहायचे। एखाद्या गोष्टीबाबत मी समजू शकते पण वर्षभर असे काही ना काही कार्यक्रम करत रहायचे म्हणजे एक प्रकारची दमणूक च असे मला तरी वाटते. आणि ज्या कोणी बायका या सगळ्या गोष्टी करतात त्या तर धन्यच !
कुठून मिळते याना ही उर्जा आणि हा उत्साह ? आणि तीच ती गोष्ट त्याच किवा थोड्या फार फरकाने वर्षानुवर्ष करून हा सगळा प्रकार montonous नाही होत का ?
अर्थात हा प्रश्न त्यानाच विचारायला हवा, मी फ़क्त माझे विचार मांडले.

Perfectionism

Every person has peculiar characteristics depending upon the way and the environment in which he/she is brought up. However, there are some qualities which disturb you when you get into the world where these do not have even negligible significance.

I have seen many people around me who have a very strange feeling or thought process. They feel that, they should just finish speedily, whatever are the (unknowingly) predefined tasks on their names and then relax.
This is not really objectionable or bad always..but not very good or ideal either, because while finishing things hastily, you might not really do the things at their best, for that matter even good/better.

For example, there is a friend of mine, she used to feel that her mom takes lot of time finishing household chores. One day, she(friend) herself had to cook, she could finish it early and told her mom. However, her mom then made her realize that she has just prepared the lunch and did not keep everything at place, did not throw away the garbage stacked during the preparation, did not clean the platform once done.

According to me, only doing things hurriedly (as if you want to show that how fast you can finish and how much time you have saved) does not really make perfect sense..sometimes maybe. Additionally, such people do not really understand, that although they think that they have finished their job, it has generated lot of work for others.

I feel that if you take up something, you should complete it by all means. Some people call it perfectionism. It may be to some extent. But sometimes, it is not really perfectionism, it is just doing something good in its entirety. If someone asks me to cook, I would do it with all my heart (though sometimes the end product is not so good ;-) ), irrespective of the time it takes, because I don't really want to show how fast I am or just do it for the sake of doing it, rather I would like to show how good I am. I strongly feel that, everyone should possess this quality up to some extent. Of course this is my opinion and some people just feel that this is a waste of time.. but I don't really get satisfaction unless I do it properly. This does not really mean that because I have lot of time, I do it that way, but it is just that I feel that has equal importance.

Monday, April 13, 2009

आशेचा किरण

आज माझ्या एका collegue ने स्वीट्स वाटले कारण त्याच्या वाहिनीला मुलगी झाली आणि घरातले सगळे मुलगी झाली म्हणुन जास्त खुश असेही त्याने सांगितले.

हे ऐकल्यानंतर एका मुलीने कमेन्ट केली की समाज सुधारतो आहे, भारतात कुठे तरी मुलीच्या जन्माचा आनंद साजरा होतो आहे. मग पुढे असे मत पडले की, ग्रामीण भागात आज ही हुंडा द्यावा लागत असल्याने कदाचित तिथे हा आनंद होत नाही. मला अर्थात हे पटले नाही. हे ही एक कारण असेल , पण आणखी एक कारण म्हणजे आज ही आपल्या समाजात मुली लग्न झाल्यानंतर आई वडीलांना आर्थिक मदत करत नाहीत, उघडपणे करू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या म्हातारापणात मुलेच त्याना आधार देऊ शकतात ही गोष्ट त्यांच्या मनात पक्की रुजली आहे. यालाच मग वंशाचा दिवा आणि त्या सदृश अनेक नावे दिली गेली आणि पुत्र जन्माचे सोहळे साजरे होऊ लागले.
का आज पण आपला समाज या अशा पद्धती पाळतो ? हुंडा , वंशाचा दिवा ? का आज ही लोकाना मुलेच हवीच असतात ? म्हणजे ज्यांनी तुम्हाला लहानपणापासून सांभाळले, मोठे केले , तुम्हाला शिकवले, त्यासाठी पैसे खर्च केले. त्यांच्या साठी मुलीनी मानसिक आधाराशिवाय दुसरे काहीच करू नये ?
माझ्या मते ज्यां आई वडीलाना सांभाळायला भाऊ आर्थिक दृष्टया सक्षम नाहीये, त्या घरी आज सुद्धा मुलींनी मदत केली तर कुणाचा विरोध असू नये आणि त्यांना ती मदत करायला प्रोत्साहन मिळायला हवे.

पण तरीही एक नमूद करायला हवे, आजच्या पिढीत थोड़ा तरी बदल दिसत आहे. हा कदाचित शिक्षणाचा परिणाम असेल आणि आज पालक आर्थिक बाबतीत जास्त सक्षम आहेत तेव्हा त्यांना स्वतःच्या म्हातारापणाची
तेवढी काळजी नाहीये, जिथे त्याना वंशाच्या दिव्याची गरज भासेल :-) .

हा आशेचा किरण उद्या मोठा प्रकाशाचा झोत व्हावा हीच प्रार्थना !

Thursday, April 9, 2009

अज्ञात तरीही प्रभावी

आजचे युग कलियुग! म्हणजे सो कॉल्ड माडर्न. इथे सकाळी उठल्यापासून आपण अनेक आधुनिक गोष्टी जगत असतो,
वापरत असतो. अंधश्रद्धेला या युगात थारा नही, हे सगळे जण मान्य करतील. तरीही प्रत्येकाचा आपापल्या परीने कोण्या एक अज्ञात शक्ती वर दृढ़ विश्वास आणि कदाचित म्हणुनच आज ही आपल्याकडे खूप वाईट घटना (आत्महत्या, नैराश्य) ऐकिवात नही. थोड्या फार(?) अधून मधून वृत्तपत्रात येत असतात, पण तरीही आपल्याकडच्या लोकसंख्येच्या मानाने कमीच किंवा, काय सांगावे सगळयांना प्रसिद्धी मिळत नसेल. असो.

तर असे आपण सगळे आधुनिक जगातले. म्हणजे मी माझ्या पिढीला संबोधून हे म्हणत आहे. एवढे असुनसुद्धा आजही आपण छोटया छोटया गोष्टिंसाठी ग्रह, तारे, दिवस, तिथी, अमावस्या आशा चक्रात अड़कलेलो.
म्हणुन मला प्रश्न आहे, खरेच का आपण आधुनिक ?? की हे फ़क्त आधुनिक असण्याचे नाटक आणि अंतर्मनात आजही आपण कुठल्याशा ग्रह तारयांवर आपले निर्णय सोडतो.

असाच एक incident झाला. म्हणुन हे सगळे प्रश्न. आता मागील आठवङयात मी स्वतः माझ्या आयुष्याची गाड़ी आणखी neat कशी चालु त्यापेक्षा धावू शकेल त्यासाठी काय करायला हवे, हे विचारण्यासठी एका ज्योतिष सदृश गृहस्थाना भेटून आले.

आणि आज मला हे जाणवत आहे, की आपल्या सगळयांची (थोड़े फार अपवाद वगळ्ता) आशा गोष्टीवर मनातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात थोडीशी श्रद्धा अजुन आहेच आणि ती काही आधुनिकतेनुसार जाणार नही. आजच्या सो कॉल्ड आधुनिक पिढीतल्या सगळ्याना हे नक्की पटेल की आपले आयुष्य आणखी चांगले करण्यासाठी आपण प्रयत्न करने जास्त गरजेचे आहे, बाकी सगळे उपाय नंतर. पण तरी आपण "त्या" लोकानी सांगितलेले सगळे उपाय अगदी न चुकता regularly करणार, पण जे आपल्या हातात आहे त्याकडे मात्र पाहणार नही.

याला के म्हणावे अंधश्रद्धा की श्रद्धा की दोन्हीची सरमिसळ ? एक मात्र आहे, या आशा गोष्टी आहेत आणि असे कही उपाय सांगणारे आहेत, म्हणुनच माणूस त्या आशेवर तरी आनंदाने पुढे जात आहे, कोण जाने शास्त्रिय्द्ष्ट्या म्हणुनच तो जास्त आनंदी राहत असेल आणि म्हणुन सुखी होत असेल आणि क्रेडिट मात्र ...


मी हे असा शास्त्रीय दृष्टिकोण लिहिला असला तरी, ती फ़क्त मनात आलेली शक्यता आहे, नाहीतर माझी श्रद्धा
( अंधश्रद्धा) आहेच या अज्ञात शक्तीवर.

Wednesday, April 8, 2009

माणुसकी

कालच एक इंसिडेंट ऐकला . माझ्याच एक colleague च्या भावाचा एक्सीडेंट जाला. अगदी किरकोळ.
तिचा भाऊ around १८ yrs old. एक साधारण ४०-४५ वयाच्या माणूस या एक्सीडेंट मध्ये पडला.
त्याला पण फरसे लागले नही, इतपत की तो स्वतः नीट चालू, फिरू आणि गाड़ी देखील चालवू शकत होता.
हा इंसिडेंट सारसबाग च्या सिग्नल जव्वळचा . त्याचे काम करण्याचे ठिकाण तिथेच जव . एका जवळच्याच हॉस्पिटल मध्ये तय माणसाने या मुलाला यायला सांगितले, just to check whether he got any injuries or so.
या colleague च्या घरच्यांची धावपळ. त्या मुलाची आई त्या हॉस्पिटल मध्ये पोहोचली. तिथल्या डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की काहीही जालऐ नही. तेव्हा हा गृहस्थ, मंगेशकर हॉस्पिटल मध्ये गेला.
तिथे after 40 check up, full body X-ray, CT scan असे सगळे केले. एवढे करून राहवले नही, म्हणून एक दात या एक्सीडेंट मध्ये पडला तर तो replace करणार आहे. आणि ही सगळी treatment A.C. रूम मध्ये.
याचा सगला खर्च करायचा त्या मुलाच्या घरच्यानी आणि हे करून ही तो पोलिस कंप्लेंट करणार नाहीये अशी खात्री देत नाहीये.

म्हणजे, आम्ही ज्यानी हे सगळे ऐकले, ते कुणीही आता इथून पुढे accident झाला तरी माणुसकी दाखावण्याच्या फंदात पडणार नाही.
एखाद्या माणसाने इतका फायदा घ्यावा ?

आणि पोलिस कंप्लेंट का नाही करून द्यायची, कारण ती केस उभी राहणार, unnecessary अनेक वर्ष चालणार, हातात तर काही पडणार नही, एवढे करून नाव ख़राब होणार ते होणार .. आणि हा सगळा मनस्ताप काहीही चूक नसताना.

परत जर ती केस बंद करायची इच्छा असेल तर, सगळ्याना पैसे चारत फिरायचे.. पुन्हा मनःस्ताप..

म्हणजे आपल्याकडे खरेच विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट राहिली नाही का ? सगळीकडे भ्रष्टाचार ....

सगळे म्हणतात, नुसते चुका दाखावण्यात अर्थ नही, तर स्वतः काहीतरी पाउल टाकले पाहिजे.. पण असे पाउल पुढे टाकुन जर दरीतच जाणार असेल तर कोण त्यासाठी धजावेल?

Sunday, November 23, 2008

Life

Through out my whole life, I read , heard or came across many definitions of life. Everytime, I used to get new definition , I would see if it has any relevance to my actual life, just like that. I used to feel I did not understand the meaning... or I used to take it very casually. I was unaware of the fact that I am practically experiencing the same that I read.

But now I am realizing , when I see that there is some gap... People say , Life is like an Ice Cream, eat it before it melts... You get only one life, so live it to fullest extent etc etc.. Philosphers have already told many aspects of life.. We feel, do these things really have any deep meaning ? I never felt so earlier.
But then, I felt yes.. There are people in the world who do not get what they want at appropriate time.. like, if a small kid likes and wants chocolates, does not get that in his childhood.... but gets when he/she grows older. Will that be really comparable to his childhood situation ? Will that give him the same happiness, that he would have got, when he was a kid ? Ofcourse not... But then, we can not control or manage situation all the time.. like if kid's parents are not economically in a good state.. In that case, although they understand, they can not fulfill nominal desires.. Such people will feel bad but still they have a very genuine reason for not living life as they wished to be..
There is another category of people who are capable of living the life as per their wish.. but still they dont for some or the other reason. For these people, I feel the above definitions of life really apply. I want to specially write for them. Everyone in this world has lot of worries may be economical, family related and many more. But should a person, stop living his TODAY for better TOMORROW.. ? Is there any end point for securing TOMORROW ? Would a person ever feel that now he has completely secured his future, and so he can now start living and enjoying his today? I have these questions, may be such people do not have or they have their own answers. Don't such people, need to understand the difference between securing the future and living the future ? We can live only TODAY, if we always keep on worrying about tomorrow, how can we enjoy our today ?
I do agree, that people should plan their future to some extent, but not to the level where in he forgets enjoying his today ... Additionally, while planning future we can not really predict the external factors... we may consider the risk but can not predict the complete impact.. so although they try to secure the future, can they really predict rather secure the future completely ? I feel , NO.. So such people should decide the extent to which they should secure their future and enjoy the present.
And finally, it is upto us, where do we want to see ourselves.